कर्जफेडीसाठी रामबाण उपाय...
पूर्वी कर्जबाजारी माणसाला समाजात मान नसे. कर्जबाजारी होणे
ही समाजात अवमानीत करणारी घटना होती. सध्या समाज जीवन बदलले आहे. त्यामुळे आजकाल
कर्ज घेण्यात कमीपणा राहिलेला नाही हे जरी खरे असले तरी पत्रिकेतील काही विशिष्ट ग्रहयोग हे कर्जबाजारीपणा
दर्शवितातच.
खरे तर सर्वसामान्य मनुष्य अडचणीत आल्यानंतरच कर्ज घेण्यास
प्रवृत्त होतो. स्वत:च्या चैनीसाठी कर्ज घेणारे क्वचितच असतात. कधी-कधी दैव व
प्रतिकूल ग्रहयोगामुळे त्यास घेतलेल्या कर्जाचे
व्याज भरणे सुध्दा अत्यंत त्रासदायक ठरते. समजा हेच कर्ज खाजगी
साव-सावकारांकडून घेतले असेल आणि त्यांचे वेळोवेळी कर्जाचे हप्ते व व्याज फेडले
नाही तर त्या पासून होणारा मनस्ताप या बद्दल कल्पना न करणेच योग्य...
लवकरात लवकर कर्जमुक्त व्हावे असे सर्वांनाच वाटत असते, असे
वाटणे काहि गैर नाही. कर्जमुक्ती लवकर व्हावी यासाठी एक सोपा उपाय सुचवित आहे.
उपाय :
§ गरजेपेक्षा कर्जाची रक्कम अधिक घ्या.
§ समजा तुम्हास रु : १०००/-
रक्कमेवी गरज असल्यास रु : १२००/-
रक्कमेचे कर्ज घ्या.
§ या रक्कमेपैकी अधिक घेतलेले रु: २००/- खर्च करु नका.
कर्जाच्या परतफेडीसाठी बाजूला काढून ठेवा.
§ ज्या दिवशी अश्विनी नक्षत्रात चंद्र जाईल त्या दिवशी मेष
लग्न उदीत असताना वरील रु: २००/-
कर्जफेडीचा पहिला हप्ता म्हणून परत करा.
§ किंवा ज्या दिवशी अनुराधा नक्षत्रात चंद्र जाईल त्या दिवशी
वृश्चिक लग्न उदीत असताना वरील रु: २००/-
कर्जफेडीचा पहिला हप्ता परत करा.
§ व्यतिपात योग असताना कधीच कर्ज घेऊ नका वा देऊ नका. हा योग
पंचांगात दाखविलेला असतो.
वरील प्रमाणे उपाय केल्यास तुमचे कर्ज सहजगत्या फिटेल.
तुम्ही कर्जमुक्त व्हाल. अर्थात जे सुदैवी असतात तेच लोक हा सल्ला मानतात हा भाग
वेगळा.....
( संदर्भ : कृष्णमूर्ती सिध्दांत - कै. ज्योतींद्र हसबे.)
No comments:
Post a Comment