आकाशातील ग्रहनक्षत्रांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम.
आपल्यापैकी ब-याच जणांना “
रोजनिशी “ लिहिण्याची सवय असेल, तर ती अत्यंत चांगली सवय आहे. रोजनिशी म्हणजे आपले
स्वत:चे प्रतिबिंब. स्वत:च्या वागणुकीचे मूल्यमापन व अभ्यास करण्याचे उत्तम साधन.
पंचांगात इंग्रजी तारीख व तिथीचा उल्लेख केलेला असतो. “ रोजनिशी “ लिहिताना
इंग्रजी तारखे- बरोबर मराठी तिथी लिहिण्यास विसरु नका.
तिथी आणि त्यापुढे स्वत:ची
त्या दिवसाची मन:स्थिती, लहान-मोठया गोष्टीने येणारा क्रोध, क्रोध न येणे, सिनेमा
पाहणे, खाण्या-पिण्याची इच्छा, तीव्र-मध्यम-मंद, कामवासना, प्रसन्नता, उदासिनता, मंदिरात
जाणे, सत्संग वगैरे. दिवसभरात जे विशेष असेल ते लिहा. आणि वर्षभरानंतर ती “
रोजनिशी “ पुन्हा पाहा.
तिथीप्रमाणे व चंद्रराशीप्रमाणे वर्गीकरण करा. तुम्हाला
अश्चर्य वाटेल की, एखाद्या तिथीला तुमची एखादी इच्छा तीव्र-मध्यम-मंद असेल तर एक
वर्षानंतर त्याच तिथीला तुमची संबंधित इच्छा मागील वर्षाप्रमाणे जवळपास तशीच असते
म्हणजेच साम्य असते. एक प्रकारची Cyclic Orderसापडेल. अर्थात प्रत्येक व्यक्तीसाठी Cyclic Orderवेगवेगळी असेल. तिथी वेगळी
असेल. उदा. एखाद्या व्यक्तीला पंचमीला क्रोध येईल तर दुस-यास अष्टमीस येईल.
व्यक्ती-व्यक्तीत फरक पडेल. परंतु प्रत्येक व्यक्तीबाबतीत त्याचे पुनरावर्तन होत
राहते.
जर प्रत्येकानेच आपला स्वत:चाच असा तिथीनुसार अभ्यास करुन, स्वत:च्या
शुभ-अशुभ तिथी शोधून काढल्या तर अधिक सुखप्राप्तीसाठी व दु:ख टाळण्यासाठी याचा
खूपच उपयोग होईल. समजा ज्या दिवशी क्रोध येण्याची तिथी असेल त्या दिवशी चांगल्या, सात्विक लोकांच्या सान्निध्यात राहून क्रोध टाळता येईल. या व्यतिरीक्त असे असंख्य
फायदे आहेत.
जन्मपत्रिकेमधील
चंद्र,सूर्य व इतर ग्रहांचे स्थान, त्यांचे परस्परांमधील होणारे योग या नुसार त्या
व्यक्तीवर तिथीचा कमी अधिक प्रमाणात
परिणाम होईल.
आता नुकतेच जागतिक खगोलशास्त्र परिषदेच्या अध्यक्षांनी ( महान
खगोलशास्त्रज्ञ) स्वीकार केला आणि जाहिर केले की आकाशातील ग्रह नक्षत्रांचा
मानवी जीवनावर निश्चितच शारिरिक व मानसिक परिणाम होतो.
No comments:
Post a Comment