!--Disable Copy And Paste--> Nakshatra Jyotish: 2012

Pages

Wednesday, November 7, 2012

ज्योतिषशास्त्रामधील कानगोष्टी !

ज्योतिषशास्त्रामधील कानगोष्टी ...!




Monday, November 5, 2012

वास्तुशास्त्रात उंबरठ्याचे महत्व.


वास्तुशास्त्रात उंबरठ्याचे महत्व.

वड, पिंपळ काय किंवा उंबर काय, या सर्व झाडांना आपण पवित्र मानतोच. बहुतेक गावात एक पूर्ण वाढलेले वडाचे नाहीतर पिंपळाचे झाड असतेच. उंबराचे झाडही आपण पवित्र मानतो.

नृसिंहानी हिरण्यकश्यपुचा वध केला तेंव्हा नृसिंह अत्यंत क्रोधीत झाले होते, काहि केल्या त्यांच्या शरीराचा दाह कमी होत नव्हता, उंबराच्या फळामध्ये नखे रोवल्यानंतरच त्यांचा क्रोध हळू हळू कमी होऊन नृसिंहस्वामी शांत झाले. 

उंबराच्या फळामधील शांतरसाच्या गुणधर्मामुळेच  उंबरठ्याची संकल्पना आली. घरातील प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश करताना, उंबरठा ओलांडल्याने त्याचे मन शांत व्हावे , घरात शांतता प्रस्थापित व्हावी, सकारात्मक उर्जा प्रस्थापित व्हावी हि खरी या मागील संकल्पना आहे.

उंबराच्या पूर्ण वाढलेल्या झाडाच्या मूळाशी पाण्याचा वाहता झरा असतोअसे आढळल्यामूळेनवीन विहिर खोदतानाहा निकष लावला जातो. 

उंबराच्या झाडाखालून जातानाएकतरी उंबर खाल्ल्याशिवाय पुढे जाऊ नयेअसा संकेत आहे. गडकिल्ले भटकतानाकुठेही उंबराचे झाड दिसलेतर आवर्जून उंबराची फळे खावीत. हे फळ खाल्यास बराच वेळ तहान वा भूक लागत नाही.


उंबराचे लाकूड मजबूत असते. ते लवकर कूजत नाही. पुर्वी घराच्या दारात आवर्जून उंबराची फळी ठोकली जात असे. म्हणून तर त्याला उंबरठा म्हणायचे. सध्या उंबरठ्याच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचे लाकूड वापरण्यात येते. काहि जण लाकडा ऐवजी फरशी बसवितात, हे काही योग्य नाही असे मला वाटते.


Friday, November 2, 2012

वास्तुशास्त्रातील शयनस्थिती..


वास्तुशास्त्रातील शयनस्थिती..



देश-विदेशात “गुरु चरित्र” या 

पवित्र ग्रंथास असाधारण असे

मह्त्व आहे. याच ग्रंथात 

सदतिसाव्या अध्यायात 

विप्राच्या आचरणाबद्दल सांगितले आहे,

 या मधील ३७ व ३८ या ओव्यांमध्ये शयन स्थितीबद्दल सांगितले आहे.

गुरु चरित्र : अध्याय - सदतीसावा

स्वगृही शयन पूर्वशिरसी । श्वशुरालयी दक्षिणेसी ।

प्रवासकाळी पश्चिमेसी । शयन करावे परियेसा ॥३७॥

सदा निषिध्द उत्तर दिशा । वर्जले फळ सांगितली दिशा ।

विप्रे आचरावा ऐसा । षिमार्ग शुभाचार ॥३८॥

अर्थात : स्वत:च्या घरी पूर्व दिशेस डोके करुन झोपावे.

सासुरवाडीस दक्षिणेकडे डोके करुन झोपावे.

प्रवासकाळी पश्चिमेस डोके करुन झोपावे. 

उत्तर दिशेस डोके करुन झोपणे सर्व काळ निषिध्द आहे.

असे सांगितले आहे.या पध्दतीने झोपण्याचा प्रयत्न करुन पहा

निश्चितच निद्रासौख्याची चांगली प्रचिती येईल.


Friday, October 19, 2012

सुखी वैवाहिक जीवनासाठी उपयुक्त तोडगे.


वैवाहिक संबंध चांगले रहावेत या साठी उपयुक्त तोडगा :

गणपती या देवतेचे अजून एक नाव सिध्दिविनायक हे असून हि सर्व कार्य सिध्दिस नेणारी देवता आहे.
खालील प्रमाणे गणपतीची उपासना व पूजन केल्यास निश्चितच वैवाहिक संबंधात निर्माण होणारे ताण-तणाव कमी होऊन पती-पत्नी मधील संबंध चांगले राहतात.
१. हि उपासना व पूजन पती अथवा पत्नी या पैकी कोणीही करु शकते.
२. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षामधील बुधवारी हि उपासना व पूजन करणे महत्वाचे आहे.
३. सामुग्री : ५-५ पाने असलेल्या २१ दुर्वा. स्वत:साठी आसन.

४. ऊँ एकदन्ताय विदमहे, वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दंन्ती प्रचोदयात
ऊँ वक्रतुण्डाय हुं फट

श्रध्दापूर्वक हा मंत्र प्रत्येक वेळेस उच्चारुन वरील दुर्वांपैकी २-२ दुर्वा १० वेळा गणपतीच्या मूर्तीस अथवा तस्वीरीस वाहणे. शेवटी १ दुर्वा शिल्लक राहिल, वरील मंत्र उच्चारुन ती पण दुर्वा वाहणे. वरील मंत्र एकूण ११ वेळा म्हणावा.
.................................................................................................
वैवाहिक जीवनामधील अडथळे दूर होण्यासाठी उपयुक्त तोडगा :

 खालील प्रमाणे दुर्गा मातेची उपासना व पूजन केल्यास निश्चितच वैवाहिक जीवनात निर्माण होणारे अडथळे दूर होऊन पती-पत्नी मधील संबंध चांगले राहतात. संसार सुखाचा होतो.
१. जेथे दुर्गा मातेची उपासना व पूजन करणार आहात तो परिसर गोमूत्र अथवा गंगेच्या पवित्र जलाने शुध्द करुन घ्यावा.
२. सामुग्री : लाकडी डब्बा, सव्वा मीटर तांबडया रंगाचे वस्त्र (कापड), दिवा, स्वत:साठी आसन.
३. कापडाच्या चार घड्याकरुन लाकडी डब्यावर अंथरावे. यावर देवीची मूर्ती अथवा तस्वीर ठेवावी. शेजारी दिवा लावून ठेवावा.

४. ऊँ ह्रीं क्लीं हुं मातड्ग्यैं फट स्वाहा या मंत्राचा २१ वेळा श्रध्दापूर्वक जप करावा.

५. वरील मंत्राचा जप कमीत कमी २१ दिवस करावा. परिणाम जाणून घेण्यासाठी जास्तीत जास्त दिवस करण्यास हरकत नाही. व तसेच वरील उपासना शुक्रवारी शुभ दिवस पाहून सुरुवात करावी.

॥ शुभं भवतु ॥


Thursday, October 18, 2012

हरवलेली व्यक्ती / वस्तु लवकर सापडावी या साठी उत्तम उपाय .


व्यक्ती अथवा वस्तु हरवली असल्यास ती लवकर सापडावी या साठी उत्तम उपाय.  


कोणी व्यक्ती पळून गेली 
अथवा हरवली असल्यास 
खालील प्रमाणे कृती करावी.


कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान ।
तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ॥
हा मंत्र एका कागदावर लिहून काढावा. ध्यानस्थ होऊन १०८ वेळा वरील मंत्राचा जप करावा.
त्यानंतर तो कागद हरवलेल्या व्यक्तीची नेहमीची झोपावयाची जी जागा असेल त्या ठिकाणी रात्रीच्यावेळी जमिनीला स्पर्श होईल असा ठेवावा व त्यावर एखादा पाट अथवा लाकूड ठेवावे
वरील कृतीमुळे पळून गेलीली अथवा हरवलेल्या व्यक्तीच्या कानात कोणीतरी "घरी चल... घरी चल..." असे सतत म्हणत असते.परिणामी ती पळून गेलीली अथवा हरवलेली व्यक्ती घरी परत येते.वस्तु हरवली असल्यास वरील मंत्राचा १०८ वेळा जप केल्यास हरवलेली वस्तु सापडते. वरील उपाय करून पाहण्यास हरकत नाही.त्यामुळे झाला तर फायदाच होईल.तोटा निश्चितच नाही.
वरील मंत्राचा उपयोग आपले गेलेले वैभव पूर्ववत होण्यासाठीसुध्दा करण्यास हरकत नाही.

॥ शुभं भवतु ॥

Monday, October 15, 2012

आकाशातील ग्रहनक्षत्रांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम.


आपल्यापैकी ब-याच जणांना “ रोजनिशी “ लिहिण्याची सवय असेल, तर ती अत्यंत चांगली सवय आहे. रोजनिशी म्हणजे आपले स्वत:चे प्रतिबिंब. स्वत:च्या वागणुकीचे मूल्यमापन व अभ्यास करण्याचे उत्तम साधन. पंचांगात इंग्रजी तारीख व तिथीचा उल्लेख केलेला असतो. “ रोजनिशी “ लिहिताना इंग्रजी तारखे- बरोबर मराठी तिथी लिहिण्यास विसरु नका.

तिथी आणि त्यापुढे स्वत:ची त्या दिवसाची मन:स्थिती, लहान-मोठया गोष्टीने येणारा क्रोध, क्रोध न येणे, सिनेमा पाहणे, खाण्या-पिण्याची इच्छा, तीव्र-मध्यम-मंद, कामवासना, प्रसन्नता, उदासिनता, मंदिरात जाणे, सत्संग वगैरे. दिवसभरात जे विशेष असेल ते लिहा. आणि वर्षभरानंतर ती “ रोजनिशी “ पुन्हा पाहा.

तिथीप्रमाणे व चंद्रराशीप्रमाणे वर्गीकरण करा. तुम्हाला अश्चर्य वाटेल की, एखाद्या तिथीला तुमची एखादी इच्छा तीव्र-मध्यम-मंद असेल तर एक वर्षानंतर त्याच तिथीला तुमची संबंधित इच्छा मागील वर्षाप्रमाणे जवळपास तशीच असते म्हणजेच साम्य असते. एक प्रकारची Cyclic Order  सापडेल.  अर्थात प्रत्येक व्यक्तीसाठी Cyclic Order  वेगवेगळी असेल. तिथी वेगळी असेल. उदा. एखाद्या व्यक्तीला पंचमीला क्रोध येईल तर दुस-यास अष्टमीस येईल. व्यक्ती-व्यक्तीत फरक पडेल. परंतु प्रत्येक व्यक्तीबाबतीत त्याचे पुनरावर्तन होत राहते. 

जर प्रत्येकानेच आपला स्वत:चाच असा तिथीनुसार अभ्यास करुन, स्वत:च्या शुभ-अशुभ तिथी शोधून काढल्या तर अधिक सुखप्राप्तीसाठी व दु:ख टाळण्यासाठी याचा खूपच उपयोग होईल. समजा ज्या दिवशी क्रोध येण्याची तिथी असेल त्या दिवशी चांगल्या, सात्विक लोकांच्या सान्निध्यात राहून क्रोध टाळता येईल. या व्यतिरीक्त असे असंख्य फायदे आहेत.

जन्मपत्रिकेमधील चंद्र,सूर्य व इतर ग्रहांचे स्थान, त्यांचे परस्परांमधील होणारे योग या नुसार त्या व्यक्तीवर तिथीचा  कमी अधिक प्रमाणात परिणाम होईल.

आता नुकतेच जागतिक खगोलशास्त्र परिषदेच्या अध्यक्षांनी ( महान खगोलशास्त्रज्ञ) स्वीकार केला आणि जाहिर केले की आकाशातील ग्रह नक्षत्रांचा मानवी जीवनावर निश्चितच शारिरिक व मानसिक परिणाम होतो.         

Sunday, October 14, 2012

श्री दत्तात्रयांचे चोवीस गुरु.


चराचरांतील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व पहाण्यासाठी म्हणून श्री दत्तात्रयांनी २४ गुरु केले व त्यांच्यापासुन काय शिकलो हे यदुराजाला सांगितले तसेच कोणते गुण घेतले व कोणत्या अवगुणांचा त्याग केला हेही सांगितले.

अवधूतानें एकंदर चोवीस गुरु केले होते , अशी भागवतांत कथा आहे . ते गुरु व त्यापासून घेतलेले गुण अनुक्रमें - १ पृथ्वी - क्षमावृत्ति व परोपकारित्व , २ वायु - निर्लेपता , ३ आकाश - सर्वत्र ब्यापून असंग राहणें , ४ उदक - स्वच्छता आणि पवित्रता , ५ अग्नि - तेजस्विता , उपयोग करून घेणारा भेटेल त्याप्रमाणें होणें , ६ चंद्रमा - आत्मा अविनाशी आहे , विकार देहाला असतात , ७ सूर्य - भेदाभेदशुन्यत्व , ८ कपोत - अति आसक्ति नाशास कारण होते , १३ हत्ती - विषयाला लंपट झालें असतां नाश होतो , १४ मधुपा  ( मधुमक्षिका ) उपभोग न घेतां केलेला संचय नष्ट होतो , १५ हरिण - नादमोहित झालें असतां नाश होतो , १६ मीन - रसना ताब्यांत ठेवतां आली नाहीं तर मरण ओढवतें , १७ पिंगला (वेश्या ) - पक्षी - प्रियवस्तूचा त्याग , १९ बाल - चिंताशून्यता , २० कुमारी - एकाकी असणें , २१ शुरकृत - चित्ताचीं एकाग्रता , २२ सर्प - संगरहित , एकटयानें संचार करणें योग्य , २३ ऊर्णनामि ( कोळी )- एकाकी - ईश्वर जगत्कसें निर्माण करतो व कसा संहार होतो हें ज्ञान आणि २४ सुपेशकृत ( मिंगुरटी )- ध्यानसामर्थ्य . ( भागवत स्कंध ११ अ . - २४ )

श्री दत्तात्रयांनी केलेल्या २४ गुरुंची सविस्तर माहीती :

१. पृथ्वीः (क्षमावृत्ति व परोपकारित्व)
कोणी कितीही त्रास दिला, कितीही घाव घातले तरीही आपण त्याला मोठया मनाने क्षमा करावी हि आहे पृथ्वीची क्षमाशीलता. पृथ्वी हि क्षमाशीलतेच्या बाबतील अगदी अग्रगण्य आहे. याचच अर्थ असा की आपण जमीन नांगरतो, खणतो, तिच्यावर कुदळ चालवितो तरी ती सर्व सहन करतेच करते पण तिची परोपकारिता म्हणजे ती आपल्याला प्रत्येक घामाच्या थेंबाप्रमाणे एक ओंजळ भरुन दाणे देते. दुसरे म्हणजे या मातीचा सुगंध. हा तिचा गंध वेगळाच असतो.आपले या मातीशी असणारे नाते हे या मातीतुनच बहरते व या मातीतच सामावुन जाते. द्त्तात्रय म्हणतात कि मी या पृथ्वी कडुन सहनशीलता, क्षमाशीलता व परोपकार हे गुण घेतले. 

२. वायु (निर्लेपता, अनासक्ती)

वायु म्हणजे प्राण जो अनेक जीवांना जीवीत ठेवण्याचे कार्य करतो. तरीसुद्धा हा वायु त्यातुन अनासक्त रहातो. दत्तात्रय म्हणतात कि वायुचा हा गुण मी घेतला आहे. जीवाला चैतन्य, चेतना देतो तो हाच वायु. सुगंधाची देवाण घेवाण करतो, ग्रीष्मात जीवाला सुखावतो, पाऊस पाडतो. हा वायु सा-या विश्वाला सुख देतो पण कोणाकडुन कसलीच अपेक्षा करत नाही.



३. आकाश (असंगता, व्यापकता)
जर समानता शिकायची असेल तर ती शिकावी आकाशाकडुन. कारण आकाश हे सर्व ठिकाणी समान आहे. दत्त दिगंबरांनी आकाशाकडुन समतेचा गुण घेतला आहे. आकाशात कितीही काळे पांढ़रे ढ़ग आले तरी आकाश आपल्या ठीकाणी निर्मळ रहाते. म्हणुन मनुष्याने आकाशाकडुन अलिप्त व अनासक्त रहाण्याचा गुण घ्यावा.


४. जल (शुद्धता, पावित्र्य)

जल म्हणजेच पाणी, त्यालाच आपण जीवन म्हणतो. शुद्धता, पावित्र्यता, थंडावा व सर्व जीवांची तहान भागविणे हे पाण्याचे गुण आहे. पाणी कधीही उच्च - निच, माझा-तुझा असा भेदभाव करत नाही. मृत्युनंतर मानवाला सदगती लाभावी म्हणुनही पाणीच सोडावे लागते. दत्तात्रय सांगतात कि पाण्यापासुन आपण मृदुता, माधुर्य व लोककल्याण हे गुण घ्यावे.

५. अग्नी (तेजस्विता, उपयोगिता)

अग्नीचा गुण म्हणजे अंधाराचा नाश करुन प्रकाश देणे, तेज निर्माण करणे. होमाच्या अग्नीत पापाचा नाश होतो. अग्नी अवती भोवती जे जे अमंगळ, हीन आहे त्याचा नाश करतो व वातावरण शुद्ध करतो. अग्नीची ही कृती असंग्रहीत आहे. अवधुत सांगतात की अग्नीकडुन या गोष्टीचा बोध घ्यावा.




६. चंद्र (सोम) (देहाचे नश्वरत्व, आत्म्याचे अविनाशीत्व)

शांत व शीतल स्वभाव आहे तो चंद्राचा. मनुष्याचे मनही चंद्रासारखे शांत व शीतल असावे. मनुष्याचा मनाचा व चंद्राचा अगदी जवळचा संबंध आहे. चंद्र हा घटाबरोबर उत्पन्न होत नाही व घट फुटला तर तो नाशही पावत नाही. म्हणजेच चंद्र अविनाशी आहे. दत्तप्रभु सांगतात की मनुष्याने आत्मस्वरुपाशी चंद्राप्रमाणेच स्वाभाविक रुपात सुस्थिर रहावे.

७. सुर्य (भेदाभेद शुन्यता)
मनुष्य जीवाला जर अलिप्त राहुन कर्तव्य दक्ष रहायचे असेल तर त्याने सुर्यासारखे व्हायला हवे. सुर्य सर्व सृष्टीचा निर्माता आहे असे आपण मानतो. सुर्याकडुन आपल्याला उष्ण्ता, प्रकाश व तेज मिळते व यावरच सर्व सृष्टी चालते. जरी हा सुर्य सर्व करतो तरी तो पाऊस पाडतो. त्यामुळे अन्नधान्य पिकते. थोडक्यात संगोपन करतो, संरक्षण करतो, संवर्धन करतो तरीही अलिप्तच रहातो. तो हे सर्व करतांना पाण्याप्रमाणेच भेदाभेद करीत नाही. दत्तप्रभु सांगतात की सुर्याकडुन अलिप्तपणा, भेदाभेद व कर्तव्यदक्ष हे गुण घ्यावे.

८. कपोत (अति स्नेह व संग यांच्यापासुन वर्जित)
कपोत या पक्षाचे निरीक्षण करतांना दत्तात्रेयांनी पाहिले की नर मादी हे घरटं बांधतात व नंतर पिल्ले देतात. त्यांची जीव लावुन काळजी घेतात. जेव्हा याच पिल्लांच्या पंखात बळ येते तेव्हा हिच पिल्ले उडुन जातात. त्यावेळेस पिल्ले उडुन गेली असा शोकही हे नर मादी करत नाही. दत्तात्रेय सांगतात की आसक्ती कोणी ठेवु नये. कपोत पक्षाचा हा गुण सर्वानी घ्यावा.

९. अजगर (देवाने प्राप्त स्थितीत संतोष)
अजगर हा सुस्त व मिळेल त्यात संतुष्ट होणारा आहे. तो तोंड उघडतो व जे मिळेल त्यात सुख मानतो. अवधुत सांगतात की मानवाने सुद्ध परमार्थात जे मिळेल त्यात संतुष्ट व ईश्वर सेवेत मग्न रहावे. म्हणजेच "ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असु द्यावे समाधान".

१० समुद्र (गंभीरता)
आपली मर्यादा न सोडणे हा गुण आहे समुद्राचा. समुद्रात लाटांचा कितीही खळखळाट असला मग जरी उसळ्त्या लाटांचे जरी तांडव असले तरी समुद्र हा अंतरंगात शांत व गंभीरच असतो. कारण समुद्राचा मुळ स्वभाव हा शांत व गंभीर आहे. दत्तप्रभुंच्या मते मानवाने समुद्राकडुन मर्यादा व संयम हे गुण घ्यावे. जसे कितीही नद्या, नाले, ओढे सागरात सामावतात तरीही हो निर्मळ रहातो तसे मानवाने रहावे.

 ११. पतंग (रुप सक्तीचा नाश)
अवधुत पहातात की, दिव्याची ज्योत आणि तिच्याभोवती पिंगा घालणारा पतंग. हा पतंग ज्योतीच्या जवळ जातो तो तिच्या तेजस्वीपणामुळे. जेव्हा हा पतंग अलिंगन देतच जळुन जातो म्हणजे त्याच्या रुपाचा नाश होतो. अवधुत सांगतात की स्त्री संगतीने मनुष्याचे अधःपतन होते म्हणुन त्यापासुन दुरच रहावे.

१२. हत्ती (स्पर्श, आसक्तीचा त्याग)
श्री गजाननाला आपण जसे बुद्धीची देवता मानतो तसेच बुद्धीमान प्राणी म्हणुन हत्तीला संबोधतो. श्री दत्तात्रेय म्हणतात की मनुष्य जीवाच्या अंगी हत्तीसारखी चिकाटी व संथगती असावी परंतु हाच हत्ती जेव्हा एखाद्य हत्तीणीच्या सहवासात जातो तेव्हा तो एक प्रकारच्या बंधनात अडकतो. त्याप्रमाणे सदगुरुंना असे सुचवायचे आहे की हत्तीप्रमाणे चिकाटी व संथगती योग्य पण परस्रीचा सहवास नको. जर जीवनात काही साध्य करायचे असेल तर हत्तीचा आदर्श समोर ठेवावा.

१३. भुंगा (शास्त्रामधुन सार संचय)
प्रत्येक जीवाला वाटत असते की आपले आयुष्य आनंदी व सुखी असावे. भंगा हा फुलामधुन फक्त मधच गोळा करतो तसे मानवाने सुद्धा आयुष्यात धर्मग्रंथे, धर्मशास्त्रे व संतबोध यातुन आत्मज्ञानाचे अमृत (मध) गोळा करावे म्हणजे आयुष्यात आनंद व सुख यांचा साठा होईल.

१४. हरीण (शब्द सक्तीचा त्याग)
सदैव स्वतःच्या नादात रंगुन जाते ते म्हणजे हरीण. दत्तात्रेय सांगतात की मानवाने आपल्या उपासनेत असे रंगुन जावे म्हणजे त्याची जन्ममरणाच्या बेडीतुन सुटका होते. जसे हरीणाला माहीत नसते की आपल्याच बेंबीत कस्तुरी आहे तसेच मानवाला सुद्धा माहीत नसते की आपल्या जवळच आत्माराम आहे. तो आत्माराम आपल्याला ओळखावा लागतो, शोधावा लागतो.


१५. मधमाशी (अधिक वस्तुंचा संग्रह वर्ज्य)
माणसाने आयुष्यात संग्रह करावा पण मधमाशीचे उदहरण डोळ्यासमोर ठेवावे. मधमाशी मधाचा साठा करत जाते, त्याचे पोळं तयार करते. पण त्याचा उपयोग तिला न होता दुस-यांना होतो. म्हणुनच अवधुत सांगतात की मानवाने अति संग्रह करु नये.


१६. मासा (रसाक्तीचा त्याग)
मासा हा जलचर प्राणी. तो पाण्यासाठी तडपत असतो तसाच मानवी जीव सुखासाठी तडपडत असतो. मासा हा चपळ आहे, तो सहजासहजी कोणाच्याच हाती लागत नाही पण तो बळी पडतो अमिषाला. अवधुत सांगतात, मानवाने आपल्या जीभेवर नियंत्रण ठेवावे म्हणजे दुःखापासुन दुर राहील.

१७. वेश्या (आशेचा त्याग नैराश्येचे ग्रहण)
पिंगळा वेश्या ही जेव्हा आशेने परपुरुषाच्या बंधनात अडकते तेव्हा तिच्या वाटेला फक्त नैराश्यच पडते. पण या नैराश्येतुन तिला स्वतःच्या आत्मपुरुषाची ओळख पटते तेव्हा ती या बंधनातुन मुक्त होते. यावरुन दत्तात्रेय सांगतात की जर मानवाला जर जन्म मरणाच्या बेडीतुन मुक्तता मिळवायची असेल तर त्याने ईश्वराला शरणांगत जावे.


१८. टिटवी (प्रिय वस्तुचा त्याग)
एकदा अत्रिनंदन एका टिटवीचे निरिक्षण करतात, तिच्या तोंडात माशाचा तुकडा होता व तो मिळविण्यासाठी इतर पक्षी तिच्यावर झेप घेतात. त्यात ती खुप जखमी होते. पण जेव्हा ती तो तुकडा सोडुन देते तेव्हा ते पक्षी तिला सोडुन देतात. म्हणुन अवधुत सांगतात की आयुष्यात दुःख नको असेल तर अति संग्रह करु नये. प्रिय वस्तुंच्या त्याग करावा.


१९. बालक (चिंताशुन्य वृत्ती)
दत्तात्रेय सांगतात की मानवाला चिंताशुन्य, निष्पाप, निरागस व निस्वार्थीपणे जगायचे असेल तर बालकाकडुन या गोष्टीची शिकवण घ्यावी. जेव्हा सदगुरु बालकाकडे पहातात तेव्हा त्यांना बालकामध्ये योगीचे (साध्वी) दर्शन होते. योगी व बालक यांना मान, अपमान नसतात. ते त्या स्थितीत सुख मानतात.


२०. कुमारीका (एकाकी रहाणे)
एकदा सदगुरु भिक्षा मागता मागता एका कुमारीकेच्या घरी जातात. ती त्यांना मोठ्या आदराने बसायला पाट देते व आपण धान्य काढायला जाते. पण त्या अगोदर ती हातातल्या बांगडया काढुन ठेवते. तेव्हा अत्रिनंदन तिला विचारतात तु असे का केले? तर ती म्हणते की एकावर एक घासुन बांगडयांचा नाद होतो. याचा अर्थ असा की एकटेपणातच खरे सुख आहे. दोघजण असल्यावर फक्त दुःखच वाट्याला येते.


. शरकर्ता (चित्ताचीं एकाग्रता )
शरकर्ता, लोहाराची कामामधील एकाग्रता जशी 

असते त्या प्रमाणे भगवत भक्तीमध्ये एकाग्रता 

असली पाहिजे. असे अवधुत सांगतात.




.सर्प(संगरहित,एकटयानें संचार करणें योग्य)
साप हा प्राणी कधीच स्वत:चे घर बांधून रहात नाही, तो कधी ऊंदराच्या बिळात,झाडावर, पाण्यात सापडतो . तो एकटयानें संचार करणें पसंद करतो. प्रत्येकाचा प्रवास असाच संगरहित असतो.

. कोळी (एकाकी रहाणे)
कोळी ज्या प्रामाणे जाळे विणून स्वत:ला गुरफटून टाकतो, एकाकी राहतो. त्या प्रमाणे एकाकी राहून स्वत:ला भगवत भक्तीमध्ये गुरफटून घेतले पाहिजे असे अवधुत सांगतात.


. सुपेशकृत / मिंगुरटी ( ध्यानसामर्थ्य )
मिंगुरटीचे ध्यान, उदिष्ट किंवा लक्ष्य कधी बदलत नाही त्या प्रमाणे भगवत भक्तीचे उदिष्ट किंवा लक्ष्य हे भगवत प्राप्तीचेच असले पाहिजे असे अवधुत सांगतात.